Journalists with Maharashtra Times, Ahilydnagar. Member, Government of Maharashtra Media Accreditation Committee, Nashik Division. Views expressed are personal.
एक आमदार आई बाळाला घेऊन विधानसभेत गेली. कौतूकच.
आता त्याच आईने बाळाला घेऊन उसाच्या फडात आणि धोकादायक कामांवर जाणाऱ्या आई आणि बाळांचे प्रश्न मांडावेत. अशी अपेक्षा ठेवण्यास काय हरकत आहे.
लोकसभा निवडणूक झाली. आश्वासनांचा पाऊस पडला. आता विधानसभा निवडणूक येईल, त्याचे वारे आताच घोंगावू लागलेत. पुन्हा जोरदार बरसात होईल.
पण शेवटी खऱ्या पावसात लोकांना चिखल तुडवतच मार्गस्त व्हावे लागते. आश्वासनाचा धुरळा खाली बसतो, तेव्हा असा चिखल उरतो.
#शेवगाव (नगर ) #एसटी #बस्थानक.
पुणे अपघात : घटनास्थळावरील नागरिकांची जागरूकता आणि सोशल मीडियातून निर्माण झालेला दबाव, यामुळे परिणामकारक कारवाई होत आहे.
अन्यथा चालकाला आरोपी करून मुलाची अन बापाची तसेच अन्य यंत्रणाची अलगत सुटका झाली असती.
हे सिंडीकेट मोडून काढायला योगदान देणाऱ्यांचे कौतुकच केले पाहिजे.
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमासाठी लोकांना आणायला गेलेल्या बस रिकाम्याच परत पाठविण्यास सुरवात. जिल्ह्यात गावोगावी सुमारे एक हजार बस. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभेवर बहिष्कार असल्याचे सांगून त्या परत पाठविल्या जात आहेत.
असा इव्हीएम घोटाळा पहिलाय का?
बीड जिल्ह्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत निवडणुकीत इव्हीएमवरील सरपंच पदाच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबले जात नव्हते.
तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर आढळून आले की तेथे फेविक्विक टाकून कोणी तरी ते ब्लॉक केले होते.
शिर्डीच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना साईप्रसादालयातील मराठमोळे जेवण आवडले. त्यामुळे त्यांनी जेवण बनविणाऱ्या आचाऱ्यांना काही दिवसांसाठी दिल्लीला राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले आहे. राहुल वहाडणे आणि गोरक्षनाथ कर्डिले हे दोघे स्वयंपाकी दिल्लीला रवाना होत आहेत.
आता सत्यजित तांबे आमदार होतीलही. ते भाजपचे अधिकृत नसेनात का, पण ते अधिकृतपणे काँग्रेसचेही नसतील. हाच भाजपचा डाव यशस्वी झाला. सलग तीनवेळा काँग्रेसच्या ताब्यात असलेला मतदारसंघ अशा पद्धतीने काँग्रेसकडून काढून घेतला.
एक आमदार किती काम करू शकतो? हे कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दाखवून दिले आहे. शरद पवारांचा नातू अशी ओळख असली तरी देखील तालुक्यातील जनतेसाठी रोहित पवार मंत्रालयाचे उंबरे झिजवत आहेत :धनंजय मुंडे
यूपीएससीचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. खेडकर पूजा दिलीपराव या नावाने त्यांनी २०२०-२१ पर्यंत परीक्षा दिली. त्यानंतर २०२१-२२ मध्ये त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने प्रयत्न संपल्यानंतरही दोनवेळा परीक्षा दिली...
मदरशावर भगवे ध्वज.
मराठा आरणक्षासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई पदयात्रेचा रविवारचा मुक्काम नगरवळ बाराबाभळी येथील मदरशाच्या मैदानावर आहे. त्यानिमित्त मदराशाच्या परिसरात प्रथमच भगवे झेंडे लावण्यात आले आहेत, तेही मुस्लिम बांधवांच्या संमतीने आणि साथीने.
अहमदनगर : शिक्षक संपावर गेल्याने आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ग्रामस्थांनीच शाळा भरविली आहे. स्वतः पोपटराव पवार यांच्यासह गावातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत आहेत.
अहमदनगर : चित्र उलटताना दिसताच महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या पारनेर तालुक्यात जल्लोष सुरू. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील मतमोजणी केंद्रातून निघून गेले
कोणताही व्यावसाय ‘गोड’ अथवा ‘कडू’ नसतो. कधी इच्छाशक्ती तर कधी गरज तुम्हाला वेगळ्या वाटेने घेऊन जाते. ‘संधीचे सोने’ करण्याची वृत्ती असली तर दसऱ्याला आपट्याचे सोने होते, तसा गुढी पाडव्याला कडूनिंबाचा पालाही गोड होतो.
पोलिस भरतीला स्थगिती
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुमारे १७ हजार पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून ही प्रकिया सुरू होणार होती...
एका मंत्र्यांने पत्रकारला विचारले काही काम धंदे नाहीत का? घरी जा बायको वाट पहातेय…
दुसरा मंत्री बेरोजगारांना विचारतोय तुम्हाला काही कामं नाहीत का? दिवसभर फोन करीत बसलाय.
समजा, नाहीत यांना कामधंदे… पण मग त्यांना काम धंदे मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची?
आपण कसे मोठे झालो, हे सांगण्यासाठी सर्वांना शरद पवारांचे नाव घ्यायचे असते…
तर आपण आता किती मोठे झालो आहोत, हे दाखवून देण्यासाठीही सर्वांनाच पवारांना नावं ठेवायची असतात.
वीज कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे, त्यांचा संप दुधारी हत्यार आहे. संपकाळात लोकांना त्रास झाला तर त्यांना खासगीकरण कसे आवश्यक आहे हेच अधिक पटेल. कारण इतरवेळी तुमचा कारभार त्यांनी चांगलाच अनुभवलेला असतो. तुमच्या मागण्या योग्य असतील, लोकांना पाठींबा देतील, पण वेठीस धरले तर उलट परिणाम
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील सभेला निघालेल्या एस.टी. बस आकाशवाणी केंद्रासमोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरल्या.
शिवसेनेचा राजीनामा देत अहमदनगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर
@abhishek_shivsn
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीला. सोबत अभिषेक यांचे काका माजी आमदार दादा कळमकर.
पवारांच्या पुतण्याने साथ सोडली, तर निष्ठावान कार्यकर्त्याचा पुतण्या पुन्हा आला सोबत.
@PawarSpeaks
जालना : ही लोकसभा निवडणूक मराठ्यांनी हाती घ्यावी. स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचे ते घ्या. मी कोणालाही मतदान करायला सांगणार नाही. ज्यांनी आपल्याला त्रास दिला, छळ केला, याची आठवण ठेवून मतदान करा : मनोज जरांगे पाटील
ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि आता अग्रवाल ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण. (आधी आणि मधल्या काळात बरेच काही )
हे पहाता पुण्यातील ससून हॉस्पिटल माणसं मारण्यास मदत करणारे केंद्र बनत आहे काय?
एवढी नीच संस्कृती या हॉस्पिटलमध्ये कशी रुजली? डॉक्टर भरलेत की कसाई?
“अंतरवाली सराटी येथे होणारी सभा हिंसक होईल, मनोज जरांगे यांना तातडीने अटक करा”
: वकील गुणरत्ने सदावर्तेंची मागणी
“सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहितीे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनीच समज द्यवी”
: मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया
मराठा क्रांती मोर्चा संपल्यानंतर आता पुन्हा मराठे एकत्र येऊ शकणार नाहीत, असे म्हटलं जाऊ लागले होते.
पण पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मराठे एकत्र आले.
त्यामुळे पुन्हा जर मागण्यासंबधी दगा फटका झाला तर मराठे एकत्र येऊ शकतात, हे नक्की.
आता लॉकडाऊन आणि निर्बंधांचा संसर्ग पसरेल. अडवणूक, लुटमारीचा आजार बळावेल, त्यामागून नकली समाजसेवेची सूज येईल. गरीबी, बेरोजगारीच्या जखमा भळबळतील, राजकारणाचे किडे वळवळतील. नवे करोनायोद्धे जन्माला येतील. सामान्य माणूस आणि खरे सेवक उपेक्षित राहतील.
अहमदनगर : मला छगन भुजबळ यांच्या संबंधी प्रश्न विचारीत जाऊ नका. ग्रामीण भागात ओबीसी आणि आम्ही एकत्र राहतो. भुजबळ मध्ये आल्याने संबंध बिघडत आहेत. आम्ही संबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत राहू. : मनोज जरांगे पाटील
अहमदनगर : मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा म्हणून किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी आपले पुढील तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले. २६, २७ वर २८ जानेवारी रोजी होणारे सर्व कार्यक्रम रद्द : इंदोरीकर यांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांची माहिती.
अहमदनगर : भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना स्वत:च्या काष्टी गावात धक्का. सरपंचपदासाठी पाचपुते यांचा मुलगा प्रताप पराभूत. पुतण्या साजन पाचपुते यांनी सरपंच पदासह जादा जागा जिंकून गावावर मिळविले वर्चस्व. भावाच्या मृत्यूनंतर पाचपुते कुटुंबात प्रथमच फूट, फटका आमदार पाचपुते यांनाच.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणातून : प्रवरानगर येथील देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ ��ोते. विठ्ठलराव विखे पाटील आणि अण्णासाहेब शिंदे यांच्यासह अनेक त्यांचे सहकारी होते. नंतर यशवंतराव चव्हाण यांनी या चळवळीला बळ दिले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवारी अहमनगरच्या दौऱ्यावर आले असता सकल मराठा समाजातर्फे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला आहे. राणे यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने मराठा समाजात संतप्त भावना आहे.
विक्रांतचे पहिले कमांडिंग ऑफिसर मूळचे अहमदनगरचे
भारतीय बनावटीची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्ध नौका शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाला सुपूर्त करण्यात आली. या युद्ध नौकेचे पहिले कमांडिंग ऑफिसर कमोडोर विद्याधर हारके मूळचे अहमदनगरचे आहेत...
डॉ. पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढविली होती. पूजा यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या सरपंच आहेत.
बीड जिल्ह्यातील कळसंबर गावात समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे आज कीर्तन होते. मात्र आजारी असल्याचे कारण सांगत इंदुरीकर यांनी ते ऐनवेळी रद्द केले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नेकनूर पोलीस ठाणे गाठले, फसवणूक केल्याची तक्रार घ्यावी, या मागणीसाठी ठिय्या दिला...
चाचणीसाठी जावे तर कीट नाही, हॉस्पिटलला गेले तर बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन मिळत नाही. हे टाळण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, तर लसही उपलब्ध नाही. तरीही मरण स्वस्त झालंय म्हणून नका, तिकडेही सहजासहजी जागा मिळत नाही.
असे अनेक 'लखोबा लोखंडे' आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत. व्यक्ती पकडल्या जातील पण प्रवृत्ती नष्ट झाल्या पाहिजेत. सडके मेंदू घडविणारे अड्डे उध्वस्त झाले पाहिजेत.
मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्याची मागणी करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर हायकोर्टात प्राथमिक सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार.
तांबे पिता-पुत्र संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांसोबत...
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्माऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार
@satyajeettambe
विधान परिषदेच्या कामावर बहिष्कार टाकून मुंबईत आंदोलनात सहभागी. तर माजी आमदार
@DrSudhir_Tambe
यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला.
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण करीत असलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजातर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील पारनेरमधील ही काही दृष्य.
यावेळी ‘रेमडेसिव्हीर’च्या जागी करोनावरील अँटीव्हायरल गोळी ‘मोलनुपिरावीर’चा नंबर लागू शकतो. सध्या ५ दिवसांच्या कोर्ससाठी या गोळीची किंमत १,३९९ रुपये आहे.
सगेसोयरे संबंधी जीआर काढा आणि आणून द्या. तोपर्यंत आम्ही येथेच नवी मुंबईत बसून राहतो. प्रजासत्ताक दिनाचा मान राखून आझाद मैदानात जात नाही, मात्र जीरआर शिवाय मुंबई सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील
“माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी नगरला आले असते, तर रस्ते बंद करावे लागणे, वाहतुकीची कोंडी, रणरणते ऊन, गावोगावी हनुमान जयंतीचे कार्यक्रम यामुळे गैरसोय झाली असती. ते टाळण्यासाठी राहुल गांधींना आणले नाही.”
- नीलेश लंके, उमेदवार महाविकास आघाडी, नगर
अहमदनगर : पारनेर तालुक्यात सायंकाळनंतर मतदानाचा टक्का वाढला. दिवसभर संथगतीने मतदान झाले. त्यामुळे रात्री आठ वाजेपर्यंत तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदान सुरू होते. पाच वाजता ४६ टक्के असलेले मतदान आता ६० च्या पुढे गेल्याचे सांगण्यात आले.
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांचे पहिले आंदोलन. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार आज दुपारी कांदा आणि दूध दरवाढीच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. महाविकास आघाडीचे पदाधिकारीही यात सहभागी होणार.
आंतरवाली सराटी येथील मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेले निर्णय
-लोकसभा निवडणुकीत मराठ्यांनी अपक्ष उमेदवार द्यायचे नाहीत
-कोणत्याच राजकीय पक्षाच्या प्रचार सभांना मराठ्यांना जायचे नाही...
पुण्यातील अपघात प्रकरणात उद्योगपतीच्या मुलाला किती तासात जमीन मिळाला यापेक्षा कोर्टाने त्याला जी 'शिक्षा' दिली, ती महत्वाची आहे. त्याला १५ दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास आणि अपघात या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले आहे. हे खूप महत्वाचे आहे.
बालमोहन विद्यालयाची मुलं खूप हुशार, चुणचुणीत आहेत. फडणवीस काकांना मोदी आजोबांसंबंधी प्रश्न विचारला पण चाचा नेहरूंसंबंधी काहीच का बरे विचारले नसेल?
#BalDiwas
#बालदिन
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस. ना सरकारकडून दखल ना विरोधकांकडून.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या जागा वाढण्यात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा झाल्याचे मानले जाते. मात्र सेलिब्रेशन करताना विरोधकांनाही त्यांचा विसर पडला दिसतोय.
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी वेगळा कायदा नको. सर्व मराठ्यांना ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण मिळाले पाहिजे. सगेसोयरेंबाबत कायदा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही : मनोज जरांगे पाटील यांची सर्वेक्षण अहवाल सादर झाल्यानंतरची प्रतिक्रिया
मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आज नवी मुंबईत मुक्काम, २ दिवस APMC बंद ठेवून आंदोलकांना राहण्यासाठी जागा देणार
मनोज जरांगे यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर २५ तारखेला एपीएमसी मार्केट राहणार बंद आहे. एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार
“न्यायालय आम्हालाही न्याय देईल. आमचेही वकील कोर्टात जातील. काय नोटीस आहेत ते बघू. आमचे वकील आहेत ते बघतील. न्याय मंदिर सगळ्यांसाठी आहे. त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे? त्यात मला काही एवढं विशेष वाटत नाही...
बरं झालं अहमदनगरला उड्डाणपूल झाला. नाही तर लोकांना रस्तेरुपी नदीतून होडीने प्रवास करावा लागला असता!
आजच्या पावसाने उड्डाणपुलाखालील रस्त्याची झालेली अवस्था....!
शिर्डी :
गेल्यावेळी सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब कांबळे एकमेकांविरुद्ध लढले.
यावेळी एकत्रित प्रचार
अहमदनगर :
गेल्यावेळी सुजय विखे पाटील संग्राम जगताप एकमेकांविरुद्ध लढाले...
यावेळी एकत्र प्रचार
ज्यांचा पराभव झाला, ते यावेळी दुसऱ्याला ��ते द्या, म्हणत आहेत.
आणखी किती बदल हवा?
अहमदनगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके २९ हजार ३१७ मतांनी विजयी. अधिकृत आकडेवारी आणि घोषणा बाकी. विजयानंतर लंके यांनी उदयनराजे भोसले यांच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवित दिली प्रतिक्रिया. आता कोणाविरूद्धही काही बोलायचे नाही. मला जनतेने निवडून दिले आहे.
अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सोशल मीडियात घाणेरडी कॉमेंट, नगरजवळच्या एका गावातील सरपंच महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिलेविरुद्ध मराठा समाज आक्रमक.
“माझे वय सध्या ८० वर्षाचे आहे, आता १० किंवा २० वर्षे मला जगायचे आहे. माझ्या डोळयादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पध्दतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड- उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल...
पुण्यात वाहतूक कोंडी आणि अन्य अडचणींमुळे हिंजेवाडी आयटी पार्कमधील ३७ कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत. पुण्यात अडचण असेल तर अहमदनगरला या, असे सांगून त्यांना येथे आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे राजकीय नेतृत्व, कुशल प्रशासन आणि जनतेचा सकारात्मक दबाव गट कधी तयार होणार? ..
अंधश्रद्धेवर विश्वास नसल्याने आम्हाला फक्त एकच आत्मा माहिती आहे…
Agriculture Technology Management Agency (ATMA) म्हणजेच कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) ही संस्था.
शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना केंद्र सरकारची ही योजना २००७ पासून देशातील सर्व जिल्ह्यांत सुरू.
“चीनमध्ये करोनाची संख्या पुन्हा एकदा वाढणे चिंताजनक आहे. मात्र, करोना विरोधातील भारतात झालेले लसीकरण आणि ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता वाढत्या रूग्णसंख्येमुळे भारतीयांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही.”
-अदर पुनावाला, कोविशील्ड लस निर्माते
म्हाडा पेपरफुटी प्रकरण : महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना अखेर अटक. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन पास केल्याचा सुपे यांच्यावर ठपका. पुणे सायबर पोलिसांची दीर्घ चौकशीनंतर कारवाई.
काँग्रेससोबत मतभेद झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकाऱ्यांसह बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
त्यामुळे आताही काँग्रेसच्या सर्वच मुद्द्यांवर पवार यांच्याकडून सहमतीची, पाठिंब्याची अपेक्षा कशी ठेवता येणार?
आता अखंड मराठा समाज आणि मराठासेवक असे नामकरण. सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा वगैरे संघटना आता अखंड मराठा समाज या नावाने एकत्र. तर समन्वयकऐवजी मराठा सेवक असे पदनाम असणार, मनोज जरांगे पाटील यांच्यासमवेत बैठकीत निर्णय.
अहमदनगर : मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून अपहरण करण्यात आलेल्या दीपक बर्डे या आदिवासी युवकाचा ३१ ऑगस्टलाच खून झाल्याची माहिती पोलिस तपास उघड झाली. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोदावरी नदीत फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिस खातरजमा करीत आहेत.
महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी कमिशनची रचना केली नाही, उलट ओबीसी आरक्षण वाढवले. त्यामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा कायदा रद्द करावा आणि ओबीसी आरक्षणाचे सर्वेक्षण करावे : मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांची मुंबई हायकोर्टात याचिका. ८ ऑक्टोबरला सुनावणी.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्यावेळी बोटावर लावण्यात आलेली शाई खूपच पक्की होती. अखेर आज नखासोबतच ती गेली. निवडून आलेले आमदार
@satyajeettambe
हेही आपल्या भूमिकेवर सध्या तरी ठाम आहेत...
अहमदनगर :
नगरच्या इव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही यंत्रणेत कोणतीही छेडछाड झालेली नाही. यासंबधी व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जो कर्मचारी दिसतो आहे, तो अधिकृत कर्मचारी आहे. तांत्रिक दुरुस्ती देखभालीसाठी रजिष्टरला रीतसर नोंदी करून...
UPSC उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जात शोधून त्यांना जातीच्या संघटनेतर्फे शुभेच्छा देणाऱ्यांना काय म्हणावे?
हाच प्रकार पुढे चालून अधिकारीसुद्धा जातीवर आधारित संघटना चालवितात.
केवळ राजकारणात नव्हे प्रशासनातही असा मुळापासून जातीयवाद फोफावतो आहे.